सर्व सामान्य गरीब नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना देशांमध्ये राबविल्या जातात व त्यातील योजना म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत, आर्थिक लाभ दिला जातो जर एखाद्या गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर योजणे अंतर्गत 20 हजार रुपयांची मदत कुटुंबाला दिली जाते व त्यामुळे एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य कुटुंबाला प्राप्त होऊ शकते.
योजणे अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंब लाभ घेऊ शकणार आहेत, मृत व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्षे एवढे असावे, पंधरा हजारापेक्षा वार्षिक उत्पन्न व्यक्तीची कमी असायला हवे, अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तरीसुद्धा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत वीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- जन्म मृत्यू नोंदणी दाखला
- रेशन कार्ड
- मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
अर्ज कुठे करावा?
नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये अथवा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अथवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे व अर्ज करताना अर्ज पूर्ण भरून वरील दिलेली संपूर्ण आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज त्याठिकाणी जमा करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर मंजुरी मिळाली असल्यास वारसाच्या खात्यावर रक्कम लवकरात जमा केली जाईल.
शेत जमिनीची खरेदी करण्याचा विचार आहे? थांबा! जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी